धरण परिसंस्था
जलसिंचन, जलविद्युतनिर्मिती , पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, करमणुकीच्या स्थळांची निर्मिती आणि पर्यावरणाच्या स्वरूपात विशिष्ट सुधारणा घडवून आणणे इत्यादी उद्देशांनी नद्यांवर धरणे बांधली जातात. धरणांमुळे जलाशयाची निर्मिती होते. जगातील पाण्याच्या आणि उर्जेच्या वाढत्या मागणीबरोबर जलाशयांची संख्या व त्यांचा आकार सतत वाढत आहे.